HW News Marathi
देश / विदेश

केरळमधील मुसळधार पावसामुळे ७९ पेक्षा अधिक जणांचा बळी

कोची | केरळमध्ये ८ ऑगस्टपासून मुसळधार पावसामुळे पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आतापर्यंत ७९पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. एका बसमध्ये ८१ पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आहे.

पावसात आडकलेल्या नागरिकांना वाजवण्यासाठी दिल्ली आणि गांधीनगर या दोन्ही राज्यातून ६ अशा एनडीआरएफ १२ टीम केरळमध्ये रवाना करण्यात आल्या आहेत. तर याआधी एनडीआरएफची १८ टीम तिरुवअनंतपुरममध्ये पाठविली आहे.

मुसळधार पावसामुळे बस आणि रेल्वे फटका बसला आहे. पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही फोन करून केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्याशी पूर स्थितीचा आढावा घेतला.

केरळमधील वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे.पी.नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

swarit

‘ममता बॅनर्जींकडून हिंदी दिवसाच्या दिल्या शुभेच्छा!’

News Desk

संसदीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत शरद पवारांसह विरोधकांची ‘चाय पे चर्चा’

News Desk