HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन्ही नागरिक नॅशनल कॉन्फ्रन्सचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील कारफाल्ली मोहल्ला येथे हल्ला केला.

या दहशतवद्यांनी अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारीत तीन जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी हल्ल्या संदर्भात अधिक माहिती चौकशी स्थानिक पोलीस करत आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा राजकीय हेतूतून केल्याचा संशय एसएसपी इम्तियाझ इरसमाइल पॅरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत-चीन युद्ध पेटविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न-चीन

News Desk

दीपक तलवार प्रकरण : ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावला

News Desk

येडियुरप्पा सरकारचा पहिला निर्णय, ‘टीपू सुलतान’च्या जयंतीवर बंदी

News Desk
मुंबई

‘वारा’ संस्थेतर्फे सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण

swarit

मुंबई | मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘वारा’ या सामाजिक संस्थेतर्फे महिला कर्मचाऱ्यांना सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण संस्थेच्या संचालिका वृषाली आबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्‍या मासिक पाळीतील शारिरीक स्‍वच्‍छतेसाठी सॅनेटरी नॅपकीन उपयुक्‍त असून सफाई कर्मचारी महिलांनी याचा वापर करुन आपले आरोग्‍य जपावे, असे वृषाली आबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा विषयांवर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

वृषाली पाटील यावेळी बोलताना पुढे म्‍हणाल्‍या, महिलांच्‍या सशक्‍तीकरणामध्‍ये आपला खारीचा वाटा असावा या उद्देशातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच काही उच्‍च शिक्षण प्राप्‍त केलेल्‍या ब-याच मुली आज मोठमोठया कंपन्‍यांमध्‍ये उच्‍च पदावर काम करित आहे. स्‍वतःच्‍या पायावर उभे झालेल्‍या या मुली आईवडीलांवर विसंबून न राहता चांगल्या पगाराची नोकरी करत असून या कमाईतील काही वाटा समाजातील गोरगरीब महिलांसाठी या मुलींनी सत्‍कारणी लावावा हा उद्देश नियोजित संस्‍था स्‍थापन करण्‍यामागे असल्‍याचे वृषाली पाटील यावेळी म्हणाल्या.

स्‍त्री शक्‍तीच्‍या सशक्‍तीकरणातूनच तसेच तिच्‍या संकल्‍पनेतूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच महिलांनी याठिकाणी मोठया संख्‍येने उपस्थिती दर्शविल्‍याबद्दल त्‍यांनी महिलांचे आभार मानले. या संस्‍थेतर्फे वृषाली पाटील यांनी वीरमाता जिजाबाई उद्यानाची दैनंदिनपणे साफसफाई करणाऱ्या ५० ते ६० महिलांना मोफत सॅनेटरी नॅपकीनचे वितरण केले.

 

Related posts

आबांपासून फडणवीसांपर्यंत देवेन भारती यांना ‘विशेष’ महत्त्व

Chetan Kirdat

बेस्ट संपाचा पाचवा दिवस, मुंबईकरांना एसटीची साथ

News Desk

हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण

swarit