HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन्ही नागरिक नॅशनल कॉन्फ्रन्सचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील कारफाल्ली मोहल्ला येथे हल्ला केला.

या दहशतवद्यांनी अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारीत तीन जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी हल्ल्या संदर्भात अधिक माहिती चौकशी स्थानिक पोलीस करत आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा राजकीय हेतूतून केल्याचा संशय एसएसपी इम्तियाझ इरसमाइल पॅरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

News Desk

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk

काँग्रेस नेत्यांचं ट्विटर अकाऊंट ‘लॉक, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit