HW News Marathi
देश / विदेश

मौनी मोदी, बँक घोटाळ्यावर शांत का ?  कॉंग्रेसची मोदींवर टीका

नवी दिल्लीः पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींची घोटाळा झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलण्यास तयार नाही. यावरून विरोधक आक्रमक झाले असून एकेकाळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मौनी सिंग संबंधोणाऱ्या मोदींना आता कॉँग्रेसने मौनी मोदीची उपमा दिली आहे. नीरव मोदी मद्यसम्राट विजय माल्याप्रमाणे देश सोडून पळून जात होते, त्यावेळी”देशाचे पहारेकरी” कुठे होते?, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला देशाचा पहारेकरी असल्याचं सांगत भ्रष्टाचाराचा खात्मा करण्यासाठी ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असे आश्वासन दिले होते.

यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदी यांच्या मौन बाळगण्यामागील रहस्य जाणून घ्यायचे आहे. यावरुन पंतप्रधान मोदी कुणाच्या बाजूनं आहेत हे जगजाहीर झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

९ हजार ७४६ बोगस मतदान ओळखपत्र जप्त

News Desk

एमपीएससी म्हणजे कुठला चौकशी आयोग नाही, ज्याने इतका वेळकाढूपणा करत राहावा

News Desk

मंकीपॉक्सला WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी

Aprna