HW News Marathi
देश / विदेश

मेहुल चोक्सीने भारताचे नागरिकत्व सोडले, सरकारला मोठा धक्का

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरा व्यापारी मेहुल चोक्सी याने भारताताचे नागरिकत्त्व सोडले आहे. चोकसीने अँटिग्वा उच्चायुक्तालयात आज (२१ जानेवारी) त्याने भारतीय पासपोर्ट जमा केला आहे. पीएनबी घोटाळ्या प्रकरणात चोक्सीचा भाचा आणि हिरा व्यापारी नीरव मोदी देखील मुख्य आरोपी आहे.

नागरिकत्त्व सोडण्यासाठी चोकसीला १७७ अमेरिकी डॉलर्सचा ड्राफ्ट जमा करावा लागला. आपण नियमांच्या अधीन राहूनच अँटिग्वाचे नागरिकत्त्व घेतले असून भारताचे नागरिकत्त्व सोडले आहे, अशी माहिती चोकसीने उच्चायुक्तालयाला दिली आहे. चोकसीच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या सरकारला हा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात उद्याच (२१ जानेवारी) सुनावणी होणार होती.

आपली तब्येत ठीक नसल्याकारणाने ४१ तासांचा प्रवास करून आपण भारतात येऊ शकणार नाही, असे देखील मागणी चोकसीने मागील सुनावणीदरम्यान कोर्टाला केली होती. चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी पीएमएलए विशेष न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या याचिकेत ही माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

Aprna

#Article370Abolished : काश्मीरमधून कलम ३७० रद्द, विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk

माजी मंत्री, शिवसेनेचे अहमदनगरमधील मोठे नेते अनिल राठोड यांचे निधन

News Desk