HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारं सरकार !

अण्णा हजारेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका

मुंबई – देशात मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारे सरकार आहे अशी घणाघाती टिका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. भ्रष्ठाचार कमी करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात कोणतीच पाऊले उचलली नाहीत. उलट लोकपाल कायद्याला कमकूवत करण्याचे काम केले असा आरोप अण्णांनी केला आहे. अण्णा हजारे मोदी सरकार विरोधात लोकपाल कायद्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. त्याची रणनिती सध्या राळेगणसिद्धीमध्ये सुरू आहे.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच चक्र सध्या सुरू आहेत. लोकपाल कायद्यात मोदी सरकारने ४० दुरूस्त्या केल्या. त्यामुळे भ्रष्ठाचार संपण्या एेवजी भ्रष्ठाचारालाच संरक्षण दिले गेले असा आरोपही त्यांनी केला. मोदींनी अनेक आश्वासने दिली त्यातली किती पूर्ण केली हा संशोधनाचा विषय असल्याचा टोलाही त्यांनी सांगितला. बँक खात्यात १५ लाख देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण १५ रूपये ही त्यांनी खात्यात जमा केले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्नही गंभिर आहेत. त्यासाठीही आंदोलन उभे करू असे अण्णांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात जे सहभागी होणार आहेत त्यांच्याकडून राजकारणात प्रवेश करणार नाही असे शपथपत्र लिहून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दक्षिण भारतातून संपूर्ण चीन होऊ शकते उध्वस्त

News Desk

पाकिस्तामध्ये भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता

News Desk

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk
महाराष्ट्र

हो.. घोडेबाजार तर होणारच…..अजित पवार 

News Desk

– शिवसेना भाजपच्या नितीवर अजितदादांचा प्रहार

मुंबई महापालिकेतील वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ही बाब अपेक्षितच होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत आगामी काळातही घोडेबाजार हा होणारचं असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. भाजप आणि शिवसेनेत एका सदस्स्याचेच अंतर आहे. त्यात महापौर हा भाजपचाच होईल असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं मनसेचे ६ नगरसेवक फोडले. हीच बाब आता भाजपकडून होण्याची दाट शक्यताही पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळा घोडेबाजार आणि फोडाफोडीचेच राजकार मुंबई महापालिकेत पहायला मिळालं तर आश्चर्य नको असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेवर पवार यांनी जोरदार टिका केली. भिती पोटी शिवसेना सत्ते आहे. सत्तेतून बाहेर पडले तर त्यांचे आमदार फुटण्याची भिती शिवसेनेला आहे. शिवसेनेची अवस्था “धरले तर चावते आणि सोडले तर पळते” अशी झाल्याचा टोला ही त्यांनी लगावला. नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेचा आमदार भाजपच्या मंचावर जाऊन प्रचार करतो. त्यांची तिकीटे वाटतो आणि आपल्याच पक्षाकडे पाठ फिरवतो. हे चित्र केविलवाणे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते तर आमदाराची अशी हिंमत झाली असती काय? असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा

News Desk

नवनीत राणांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्वीट करत दिले उत्तर

Aprna

मोदी-ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात !

News Desk