HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारं सरकार !

अण्णा हजारेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका

मुंबई – देशात मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारे सरकार आहे अशी घणाघाती टिका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. भ्रष्ठाचार कमी करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात कोणतीच पाऊले उचलली नाहीत. उलट लोकपाल कायद्याला कमकूवत करण्याचे काम केले असा आरोप अण्णांनी केला आहे. अण्णा हजारे मोदी सरकार विरोधात लोकपाल कायद्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. त्याची रणनिती सध्या राळेगणसिद्धीमध्ये सुरू आहे.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच चक्र सध्या सुरू आहेत. लोकपाल कायद्यात मोदी सरकारने ४० दुरूस्त्या केल्या. त्यामुळे भ्रष्ठाचार संपण्या एेवजी भ्रष्ठाचारालाच संरक्षण दिले गेले असा आरोपही त्यांनी केला. मोदींनी अनेक आश्वासने दिली त्यातली किती पूर्ण केली हा संशोधनाचा विषय असल्याचा टोलाही त्यांनी सांगितला. बँक खात्यात १५ लाख देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण १५ रूपये ही त्यांनी खात्यात जमा केले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्नही गंभिर आहेत. त्यासाठीही आंदोलन उभे करू असे अण्णांनी सांगितले. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात जे सहभागी होणार आहेत त्यांच्याकडून राजकारणात प्रवेश करणार नाही असे शपथपत्र लिहून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकावणारा आरोपी इसम गजाआड, मुंबई ATSची कारवाई

News Desk

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk