HW News Marathi
देश / विदेश

सरकारचे प्रेम फक्त मुस्लीम महिलांवर, शबरीमलाचा निर्णय मात्र हिंदू महिलांविरोधात !

नवी दिल्ली | लोकसभेत आज (२१ जून) तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडले गेले. कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत तिहेरी तलाक मांडले. परंतु विरोधकांनी या विधेयकला विरोध करत संसदेत गोंधळ घातला. विधेयक सादर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी मतदान घेतले. यानंतर या विधेयक ७४ विरुद्ध १८६ मतांनी पास करण्यात आले.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही तात्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचा विरोध केला. ते म्हणाले की, “हे विधेयक आर्टिकल १४ आणि १५ चे उल्लंघन नाही का? तुम्ही महिलांचे हित पाहत नाही. तुम्ही त्यांच्यावर ओझे टाकत आहात. तलाक म्हणणारा तीन ३ वर्ष जेलमध्ये राहिला तर पोटगी कोण देणार? तुम्ही देणार का? तुमचे मुस्लीम महिलांवर एवढे प्रेम आहे. मग केरळच्या हिंदू महिलांवर का नाही? तुम्ही शबरीमलाच्या निर्णयाविरोधात आहात का? चुकीचे होत आहे.”

कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, लैंगिक समानता आणि न्यायासाठी हा कायदा मंजूर होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमद्ये लोकसभेत हे विधेयक पास झाले होते. परंतु राज्यसभेमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले होते. कारण राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन लोकसभेमध्ये हे विधेयक पुन्हा नव्याने आणण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन

News Desk

केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होणार, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता बजेट मांडणार!

News Desk

कर्नाटकाच्या आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk