HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरामध्ये मोदी सरकारचा विजयरथ

ईशान्य भारतातील त्रिपुरामध्ये भाजपला ४० जागांवर विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) ला १९ जागांवर निवडूण आली. तर काँग्रेसला या निवडणुकीत एक ही जागा मिळवण्यात यश आले नाही. भाजप सरकारचा विजयरथ थांबवण्यात कोणालाही यश आले नाही. या निवडणुकीत सर्व पक्ष्यांचे मिळून एकूण २९२ उमेदवार रिंगणात होते.

त्रिपुरामध्ये १९९३ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) पक्ष्याची स्थापन झाली. गेल्या २० वर्षापासून राज्याची सत्ता मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या हाती होती. सीपीएमला टक्कर देणे हे भाजपसाठी काही सोपे नव्हते. पण, भाजपने त्यांच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली होती.

२०१३मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरात ५० उमेदवार उभे केले होते. तेव्हा भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला फक्त १० जागा जिंकण्यात यश आले होते. त्यावेळी माकपाने ४९ जागा मिळून सत्ता स्थापन केली होती.

या त्रिपुरातील भाजपाचे अध्यक्ष विप्लव देव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानले जात आहे. आता मेघालय आणि नागालँड या दोन राज्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. येथे कोणत्या पक्षाची सरकार येईल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये करणार प्रवेश

swarit

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

राज्यातील सत्तांतरावर 10 जानेवारीला सुनावणी होणार

Aprna
क्राइम

अपहरण झाल्याचा बनाव, स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड

swarit

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात राहणारी अल्पवयीन मुलीने स्वताच भावाच्या मदतीने अपहरण झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री उशीरा मुलीने कबुली दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीने तिच्याच घरच्यांवर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुलीचे अपहरण झाल्याचे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सूरू केले होते.

मुलीच्या लहान भावाने ओमनी कारमधुन आलेले व्यक्ती तिला पळून नेले असे मुलाने घरच्यांना सांगितले. त्यानंतर घरच्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी तपास केले असता घटनास्थळापासून काही अंतरावरच्या मेडिकलमध्ये सापडली आहे.

जेव्हा पोलिसांनी तिचा कसून चौकशी केली त्यानंतर तिने स्वतांच अपहरण झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक माहिती दिली आहे.

मुलीने राजेस्थानमधील एका तरूनासोबत मैत्री केली होती तिच्या मैत्रीला घरच्यांनी विरोध केला यामुळे तिने स्वताच अपहरनाची खोटी माहिती दिली.

Related posts

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk

महिलेला छम्मक छल्लो बोलला म्हणून १ रूपया दंड

News Desk

नगर:विषारी दारु विक्रीमुळे मृत्युस कारणीभुत असलेले ३ जण नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

News Desk