HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरामध्ये मोदी सरकारचा विजयरथ

ईशान्य भारतातील त्रिपुरामध्ये भाजपला ४० जागांवर विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) ला १९ जागांवर निवडूण आली. तर काँग्रेसला या निवडणुकीत एक ही जागा मिळवण्यात यश आले नाही. भाजप सरकारचा विजयरथ थांबवण्यात कोणालाही यश आले नाही. या निवडणुकीत सर्व पक्ष्यांचे मिळून एकूण २९२ उमेदवार रिंगणात होते.

त्रिपुरामध्ये १९९३ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) पक्ष्याची स्थापन झाली. गेल्या २० वर्षापासून राज्याची सत्ता मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या हाती होती. सीपीएमला टक्कर देणे हे भाजपसाठी काही सोपे नव्हते. पण, भाजपने त्यांच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली होती.

२०१३मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरात ५० उमेदवार उभे केले होते. तेव्हा भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला फक्त १० जागा जिंकण्यात यश आले होते. त्यावेळी माकपाने ४९ जागा मिळून सत्ता स्थापन केली होती.

या त्रिपुरातील भाजपाचे अध्यक्ष विप्लव देव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानले जात आहे. आता मेघालय आणि नागालँड या दोन राज्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. येथे कोणत्या पक्षाची सरकार येईल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव

News Desk

#PulwamaAttack : इम्रान खान यांचा फोटो झाकल्याने पीसीबी नाराज

News Desk

सहा जणांचे प्राण वाचवण्यासाठी अंशी जणांनी घातला जीव धोक्यात

News Desk
राजकारण

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

News Desk

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६० जागा मिळणे आवश्यक आहे. सध्या स्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक ९० जागी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाला १६ पिछेहाट, एआयएमआयएमला ५, भाजपला १ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.

तेलंगणा विधानसभेचे निकालांचा कल पाहता निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेता उत्तम कुमार रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच रेड्डी पुढे असे देखील म्हणाले की, व्हीव्हीपॅट स्लिपची देखील पुन्हा मोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Aprna

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

News Desk

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पदाचा दुरुपयोग; तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा! – अजित पवार

Aprna