HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरामध्ये मोदी सरकारचा विजयरथ

ईशान्य भारतातील त्रिपुरामध्ये भाजपला ४० जागांवर विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) ला १९ जागांवर निवडूण आली. तर काँग्रेसला या निवडणुकीत एक ही जागा मिळवण्यात यश आले नाही. भाजप सरकारचा विजयरथ थांबवण्यात कोणालाही यश आले नाही. या निवडणुकीत सर्व पक्ष्यांचे मिळून एकूण २९२ उमेदवार रिंगणात होते.

त्रिपुरामध्ये १९९३ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) पक्ष्याची स्थापन झाली. गेल्या २० वर्षापासून राज्याची सत्ता मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या हाती होती. सीपीएमला टक्कर देणे हे भाजपसाठी काही सोपे नव्हते. पण, भाजपने त्यांच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली होती.

२०१३मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरात ५० उमेदवार उभे केले होते. तेव्हा भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला फक्त १० जागा जिंकण्यात यश आले होते. त्यावेळी माकपाने ४९ जागा मिळून सत्ता स्थापन केली होती.

या त्रिपुरातील भाजपाचे अध्यक्ष विप्लव देव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानले जात आहे. आता मेघालय आणि नागालँड या दोन राज्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. येथे कोणत्या पक्षाची सरकार येईल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासासाठी राज्य-केंद्र अशा दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असावं! – पंतप्रधान मोदी

News Desk

अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे 

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

News Desk