HW News Marathi
देश / विदेश

विकासासाठी राज्य-केंद्र अशा दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असावं! – पंतप्रधान मोदी

गोवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारबाबत एक मोठं विधान केलं आहे. मोदी म्हणतात की, “राज्याच्या विकासासाठी दोन्हीकडे एकाच विचारांचं सरकार असणं गरजेचं आहे.” यावेळी ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना मोदींनी हे विधान केलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वगुणांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी ‘डबल इंजिन’ सरकारचा उल्लेख केला. राज्याची प्रगती, विकास होण्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाच विचारांचं सरकार हवं असं मतं मोदींनी यावेळी व्यक्त केलं आहे.

येत्या वर्षातील गोवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली आहे. स्वतः तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात भाजपला शह देण्यासाठी तृणमूल काँग्रेसला साथ देण्याचं आवाहनही केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपदेखील आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचं दिसून येत आहे.

आम्ही गोवा स्वयंपूर्ण करू! – मोदी

गोव्यात सद्यस्थितीत आहे तशाच स्थिर सरकारची गरज असल्याचंही मोदींनी यावेळी बोलून दाखवलं. त्याचसोबत, लोकांचा आशीर्वाद मिळाल्यास आम्ही गोवा स्वयंपूर्ण करू असा विश्वासही पंतप्रधांनी यावेळी व्यक्त केला आहे. कोरोना लसीकरण, पर्यटन इत्यादी विषयांवर देखील यावेळी मोदींनी भाष्य केलं आहे. गोव्यात १०० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून येत्या काळात पर्यटनातही वाढ होईल असं मोदी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाजासह पाकिस्तानविरोधी !

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna