HW News Marathi
देश / विदेश

रशिया-युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत आणण्यासाठी जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई | रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. याठिकाणी अडकलेले विद्यार्थ्यांना मायदेशात आण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट केले आहे. जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे. त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा,” अशी विनंती करणारे ट्वीट त्यांनी केले आहे.  

युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केले आहे

रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.त्यांना मदत हवी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

News Desk

“व्यवहार माझे, जबाबदार वाझे !”, अमृता फडणवीसांनी डिवचले

News Desk

जम्मू विमानतळावर स्फोट, बॉम्बशोध पथक दाखल

News Desk