HW News Marathi
देश / विदेश

“आजच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भरतेचे दर्शन”, बजेटनंतर पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “असा अर्थसंकल्प पाहायला कमीच मिळतो, ज्यामध्ये सुरुवातीच्या एक दोन तासांमध्येच एवढ्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना असं वाटत होतं की, सरकार सामान्य जनतेवरचा भार वाढवेल. मात्र आमच्या सरकारने सातत्याने प्रयत्न केला आहे की, अर्थसंकल्प पारदर्शक असायला हवा. मला आनंद आहे की, आज अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचे कौतुक केले.” असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. हे आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचं बजेट आहे.” अशा शब्दांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आजच्या बजेटमध्ये देशाला आत्मनिर्भर करणयासाठी प्रयत्न केले गेले आहेत. आरोग्यव्यवस्थेवर आधारित हे बजेट असून, यामध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली गेलेली आहे. संधीची समानता हे सूत्र लक्षात घेत या बजेटमध्ये महिलांसाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. रोजगार संधी वाढवण्यासाठी एमएसई क्षेत्राला चांगला निधी देण्यात आलेला आहे.” असं देखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाचे हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष, ‘भाजप’ची ताकद पणाला

News Desk

मोदी सरकारच्या यु-टर्नचा वाचला पाढा, खासदार सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांवर पलटवार…

News Desk

“…सर्व समर्थक उड्या मारत होते”, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीका

Aprna