HW News Marathi
देश / विदेश

‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली | केंद्र सरकारने गेल्या वर्षी झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत आज (५ फेब्रुवारी) केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्याच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला आहे.

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

“देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे. शेतकरी संघटनांना दोन महिन्यांपर्यंत विचारण्यात आले की कायद्यात काय चूक आहे? मात्र शेतकरी नेते हे सांगू शकले नाहीत, की कायद्यात काय कमतरता आहे. शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन व्हायला हवे. कायद्यात काय कमतरता आहेत, हे शेतकरी नेत्यांनी सांगावे?”, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थायलंडच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये मराठमोळ्या किर्लोस्करांचे अमुल्य योगदान

News Desk

“….त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार आहे”, भाजपने ममतांना सुनावले

News Desk

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

News Desk