HW News Marathi
देश / विदेश

खासदार नवनीत कौर राणा यांची लोकसभेत महाविकासआघाडी विरोधात जोरदार फटकेबाजी

नवी दिल्ली | आज (९ फेब्रुवारी) खासदार नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. “फडणवीस सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेलाठाकरे सरकारने स्थगिती दिली. केंद्राच्या अनेक योजनांना त्यांनी स्थगिती दिल्यामुळे आम्ही त्यांना स्थगिती सरकार असं नाव दिलं” अशी फटकेबाजी नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे.

“म्हणून स्थगिती सरकार नाव पाडलं”

केंद्र सरकारची जी योजना आली, तिला आधी स्थगिती देण्याची परंपराच विद्यमान सरकारने सुरु केली. त्यांना आम्ही स्थगिती सरकार असं नाव दिलं. मुंबई मेट्रो आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्राम सडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रील्ड, सीएम फेलोशिप, मुंबई पुणे हायपर लूप, नगरविकास आणि ग्रामविकासाच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे, असं नवनीत राणांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात कृषीसंबंधी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे एके काळी सिंचनात मागे राहिलेला महाराष्ट्र सूक्ष्म सिंचनात टॉप पाचात येऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. ही योजना राज्यात यशस्वी झाली. या योजनेमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत ६ लाख प्रकल्प २२ हजार गावांत सुरु झाले. परंतु दुर्दैवाने ठाकरे सरकारने त्याला स्थगिती दिली, असं नवनीत राणा यांनी लोकसभेत सांगितलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल

News Desk

काँग्रेसची ऑफर जेडीएसचा पाठिंबा

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हॅलिपॅडसाठी तब्बल १००० झाडांची कत्तल

News Desk