HW News Marathi
देश / विदेश

नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते | मनमोहन सिंग

नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती संकुलामध्ये असणाऱ्या नेहरू मेमोरियल-म्युझियम आणि लायब्ररीमध्ये (एनएमएमएल) बदल करून नेहरू यांनी देशासाठी दिलेल्या योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सांगितले आहे.

या पत्रात सिंग यांनी म्हटेल की, पंडित जवाहर लाल नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. त्यामुळे तीन मूर्ती संकुल आहे. तसे राहावे अशी अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. तसेच माज पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदाही एनएमएमएलचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु मोदी सरकारच्या काळात हे दु:ख होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

नेमका वाद काय ?

दिल्लीमधील तीन मूर्ती संकुलामध्ये नेहरू मेमोरियल-म्युझियम आणि लायब्ररीमध्ये (एनएमएमएल) आहे. यात देशातील आतापर्यंतचे सर्व पंतप्रधानांची स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहून विरोध दर्शविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत आजही ‘कोरोना’च्या दुसऱ्या स्टेजवरच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk

मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी झाली, मात्र ‘ही’ आहे अडचण

News Desk

“व्यवहार माझे, जबाबदार वाझे !”, अमृता फडणवीसांनी डिवचले

News Desk