HW News Marathi
देश / विदेश

नव्या वर्षात रोजगारसंधीसाठी मोदी सरकार राबविणार नवी योजना

नवी दिल्ली | आपल्या देशातील अनेक समस्यांपैकी बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येवर उपाय म्हणून येत्या नव्या वर्षात आता मोदी सरकारकडून एक नवी योजना राबविण्यात येणार आहे. वरुण मित्र योजनेंतर्गत १ जानेवारी २०१९ पासून मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिनिस्ट्री ऑफ एम.एन.आर.ई आणि एन.आय.एस.ई कडून आयोजित करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत सरकारकडून लोकांना तीन आठवड्यांची मोफत ट्रेनिंग दिली जाणार आहे. १ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत या योजनेंतर्गत ट्रेनिंग सुरू राहणार आहे. यासाठी जवळपास १२० तास वर्ग घेतले जाणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर ही आहे.

विशेष म्हणजे या योजनेमुळे देशातील तरुणांचा नोकरीचा प्रश्न मिटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे, या योजनेमुळे केवळ नोकरी मिळविण्यासाठीच नव्हे तर जास्त पगार मिळविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ज्यात जवळपास 120 तास क्लास दिले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकराने वडापाव विकून केली शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

News Desk

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk