HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात नऊ नवे चेहरे!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात आज (रविवार) नऊ नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले असून, चार राज्यमंत्र्यांना बढती देण्यातआली. मात्र भाजपच्याच खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एनडीएतील मित्रपक्ष शिवसेना, जेडीयू, अण्णा द्रमुकला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेशिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, त्यांचे मंत्री या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी एकूण १३ जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

तीन वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. तर, एकूण ९ नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच, बिहारमधून माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह, उत्तर प्रदेशातून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह,दिल्लीमधून संयुक्त राष्ट्रसंघातील माजी स्थायी प्रतिनिधी हरदीप पुरी, केरळमधून माजी सनदी अधिकारी के. जे. अल्फन्स कनाथमन अशा चार माजी नोकरशहांचा नव्या मंत्र्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय बिहारचे अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशातूनशिवप्रताप शुक्ला आणि टिकमगडचे खासदार वीरेंद्रकुमार, कर्नाटकातून अनंतकुमार हेगडे, राजस्थानमधून गजेंद्रसिंह शेखावत यांनासंधी मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) फक्त कागदापुरती आणि बैठकीपुरती राहिली आहे. आजचा मंत्रिमंडळ विस्तार हा फक्त भाजपचा होता, आजएनडीएची हत्या झाली, अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

नवे राज्यमंत्री

शिवप्रताप शुक्ला (राज्यसभा खासदार, यूपी सरकारमध्ये ८ वर्षे मंत्रिपदाचा अनुभव)

अश्विनीकुमार चौबे (बिहारमधून ५ वेळा लोकसभा खासदार. बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाचा अनुभव)

डॉ. वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेशातून ६ वेळा लोकसभा खासदार. दलित समाजाचे नेते)

अनंतकुमार हेगडे (खासदार – उत्तर कर्नाटक)

राजकुमार सिंह (खासदार – बिहार. माजी सनदी अधिकारी. गृहसचिवपदाचा अनुभव)

हरदीपसिंग पुरी (१९७४च्या बॅचचे माजी आयएफएस, सुरक्षा व परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक)

गजेंद्रसिंह शेखावत (खासदार – राजस्थान)

डॉ. सत्यपाल सिंह (खासदार – यूपी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त)

अल्फन्स कनाथमन (१९७९च्या बॅचचे माजी आयपीएस अधिकारी)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna

कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर CAA लागू करणार; अमित शाहांनी केले मोठे वक्तव्य

Aprna

चाळीस महिने सत्तेत असून जुन्या सरकारवर टीका कशासाठी 

News Desk