HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीची परदेशातील संपत्ती जप्त

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ही मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील कलम ५ अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.

नीरव मोदीची परदेशात ४ हजार कोटींची मालमत्ता असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्यानंतर ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. या दोघांनी मिळून पंजाब नॅशलन बँकेच्या मुंबईतील शाखेत काही कर्मचाऱ्यांच्या साथीने १३ हजार कोटींचा घोटाळा केला आणि ते देश सोडून फरार झाले आहेत.

या आधी ईडीने मोदींच्या ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती जप्त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मोदींचे २१६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चारा घोटाळाप्रकरणी CBI विशेष न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव दोषी

Aprna

पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी अचानक पोहोचले लेह-लडाखमध्ये

News Desk

“मी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला”, अशोक गेहलोत यांची घोषणा

Aprna
महाराष्ट्र

भारत स्वतंत्र विचारांचा देश | प्रणव मुखर्जी

News Desk

नागपूर | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून देशभरात ज्या चर्चांना ऊधान आले होते त्यांना आता अखेर पुर्ण विराम मिळाला आहे. मी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडणार आहे अस बोलत माजी राष्ट्रपतींनी भाषणाची सुरुवात केली. भारत स्वतंत्र विचारांचा देश असून देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे व भेदभाव, तिरस्कार करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल अस मत प्रणव मुखर्जींनी व्यक्त केले.

भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित, त्यामुळे भारताचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. विविधतेत एकता हेच भारताचे सौंदर्य आहे. भारतातूनच जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला असल्याचे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवाद कोणत्याही एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नसतो. भारतावर अनेक हल्ले झाले, राजवटी आल्या, तरीही भारतीय संस्कृती अबाधित आहे. विविधता, सहिष्णुता यांच्यामध्ये भारत वसलेला आहे. हेच गेल्या ५० वर्षांपासून शिकत आलो आहे. भारतातील विविध वर्ण, धर्म, भाषा हीच भारताची खरी ओळख आहे.

 

सात धर्म, १२२ भाषा, १६०० बोली भाषा , तरीही १३० कोटी व्यक्तींची ओळख भारतीय म्हणूनच आहे आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सर्वांनी मिळून भारताची खरी ओळख होते. तसेच संविधानामुळे राष्ट्रीय भावना ही अधिक दृढ होत असते असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज संघाचा कार्यक्रमात व्यक्त केले.

Related posts

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Aprna

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला! – पंकजा मुंडे

Aprna

मनसे-भाजप युती होईल का? प्रविण दरेकरांचे सुचक वक्तव्य

News Desk