HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या त्याचप्रमाणे काश्मीरचे विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारतावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानकडून भारत-पाकिस्तान या दोन देशांना जोडणारी ‘समझौता एक्सप्रेस’ थांबविण्याचा, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड करण्याचा त्याचप्रमाणे भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा असे एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले. इतकेच नव्हे तर पाकिस्तानकडून आम्ही युद्धाला तयार असल्याचे देखील सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सडकून टीका केली आहे.”केंद्राने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. त्यामुळे आपल्या शेजारी देशाला मोठे दु:ख झाले. म्हणूनच ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकवेळ तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता पण शेजारी बदलणं तुमच्या हातात नसतं. त्यामुळे पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाच्या वाट्याला येऊ नये”, असे म्हणत राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या आक्रमक निर्णयाबाबत, भूमिकेबाबत राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : माझ्या दुसऱ्या मुलालाही सीमेवर पाठवेन, परंतु पाकिस्तानला धडा शिकवा !

News Desk

#DelhiResult : ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार !

swarit

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk