HW News Marathi
देश / विदेश

आता समलैंगिक विवाहांसाठी लढाई

मुंबई | भारतात परस्पर संमतीने जर समलैंगिक संबंध ठेवले गेले तर तो गुन्हा मानण्यात येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालायने अवघ्या दोनच दिवसांपूर्वी दिला आहे. संपूर्ण देशभरातून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. परंतु समलैंगिक ठेवणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी विवाह करण्यास संमती आहे का? हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. आता समलैंगिक विवाहांनादेखील संमती देण्यात यावी, असे समलैंगिक समुदायाचे म्हणणे आहे. केंद्राने मात्र समलैंगिक विवाहांना संमती देण्यास आपला नकार असल्याची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे.

अद्याप भारतात समलैंगिक विवाह कायद्याने अवैधच

‘जेव्हा समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल होईल तेव्हा समलैंगिक विवाहांना मान्यता न देण्याचीच भूमिका केंद्र सरकारतर्फे मांडण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. ‘भारतात समलैंगिक विवाहासाठी अद्याप कोणताही कायदा नाही. त्यामुळे जरी दोन समलैंगिक व्यक्तींनी परस्परांशी विवाह केला तरी तो कायद्याने अवैधच असेल,’ असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपच्या अनेक मंत्री आणि नेते मंडळींना सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय रुचला नसल्याची चर्चा आहे.

हक्कांची लढाई अजूनही संपलेली नाही

समलैंगिक संबंधांना जरी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाली असली तरी अजूनही लढाई संपलेली नाही. आता समलैंगिक विवाहांना मान्यता मिळावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली जाणार आहे. अजूनही समलैंगिक समुदायातील व्यक्तींची समाजात मानाचे स्थान, समान वागणूक, लोकांनी त्यांना आपले म्हणून स्वीकारावे या मूलभूत हक्कांसाठीची लढाई अजूनही सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

५० लाखांचा विमा उतरवून बहिणीची हत्या

News Desk

…म्हणून नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत – संजय राऊत

News Desk

भारतीय वायुसेना दलाचे मिग २१ विमान कोसळून अपघात

News Desk
मुंबई

भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, माहुल गाव हादरले

swarit

मुंबई | चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये जोरदार स्फोट होऊन आग लागली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण चेंबूर हादरलं आहे. या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे सायनपर्यंत त्याचे हादरे जाणवले असून लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

चेंबूर येथे बीपीसीएलमध्ये स्फोट झाला. यामुळे माहूलगाव परिसर हादरला आहे. रिफायनरी प्रकल्पापर्यंत ही आग पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या जवळच मोनो रेल्वे व पूर्व मुक्त मार्ग आहे.

स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर अतिशय धोक्याखाली आला होता. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना लवकरात लवकर तेथून बाहेर जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे.

घटनास्थळाजवळ असणाऱ्या इतर प्रकल्पांना धोका पोहोचू नये म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी आणि रिफायनरीच्या अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच २०० ते ३०० कर्मचारी आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्वात दाट परिसर म्हणून यास ओळखले जाते. याठिकाणी अनेक इतरही प्रकल्प आहेत, त्यामुळे आग वेळीच विझवणे शक्य झाले नाही तर इतर प्रकल्पांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूला अनेक झोपडपट्ट्या असून अशी घटना घडल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. सध्या सहा रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related posts

गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज उपलब्ध

Gauri Tilekar

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

News Desk

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk