HW News Marathi
देश / विदेश

सीबीआयचे दोन्ही अधिकारी सक्तीच्या रजेवर, नागेश्वर राव अंतरिम प्रमुख

नवी दिल्ली | सीबीआयचे संयुक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अंतरिम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्राने या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. सीबीआयने क्रमांक दोनचे अधिकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर मांस व्यापारी मोईन कुरेशी यांच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले होते.

सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून निवड झालेले एम. नागेश्वर राव हे तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याचे आहे. तसेच १९८६ च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या जागेवर तत्काळ नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘त्या’ व्हिडिओ लिकच्या धमकीमुळं तरूणीची आत्महत्या

News Desk

#COVID19 : देशातील ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन

Aprna
देश / विदेश

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

‘नॅशनल फूड डे’ हा भारतात २४ ऑक्टोबरला साजरा केला जातो. सरकारद्वारे खिचडी हा अन्नपदार्थ ४ नोव्हेंबर २०१७ ला भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ म्हणून घोषित करण्यात आले होते. खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करण्यामागे बरीचशी कारण आहेत. खिचडी हा पदार्थ अतिशय लोकप्रिय असल्याने भारतात घराघरात खिचडी बनविली जाते. हा पदार्थ फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक देखील असतो. खिचडी आयुर्वेदिक असल्याने ती अनेक आजारांवर उपायकारक आहे. खिचडी बनवतांना जे पदार्थ वापरण्यात येतात ते सर्व आयुर्वेदिक असतात. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नाही तर रुग्णांना सुद्धा खिचडीच खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. खिचडी हा अन्नपदार्थ गरिबांना परवडणारा आहे

२०१७ पासून खिचडीला भारताचे राष्ट्रीय अन्नपदार्थ म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय अन्न म्हणून सरकार कोणता अन्नपदार्थ घोषित करणार यावर सर्वांचे लक्ष लागून होते. अनेक अन्य खाद्य पदार्थ भारताचे राष्ट्रीय अन्न घोषित करण्याची अफवा होती. मात्र शेवटी खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करण्यात आले होते. खिचडी हा पदार्थ सर्व जाती-धर्माचे लोक आवडीने खातात. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करूनच खिचडी बनवता येते. त्यासाठी वेगळी विशेष सामग्री लागत नाही. खिचडीत दोन प्रकार असतात एक म्हणजे फोडणीची खिचडी आणि दुसरी साधी खिचडी .फोडणीची खिचडी बनवण्यासाठी डाळ, तांदूळ काही भाज्या तसेच उपलब्ध असलेली मसाले वापरण्यात येते. खिचडी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात बनवली जाते.

Related posts

आयुष्यभर काँग्रेस नेते गांधी कुटुंबियांची ‘गुलामीच’ करणार

News Desk

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

सामान्यांचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, केंद्राला ठरवावंच लागेल – सामना

News Desk