HW News Marathi
देश / विदेश

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

‘नॅशनल फूड डे’ हा भारतात २४ ऑक्टोबरला साजरा केला जातो. सरकारद्वारे खिचडी हा अन्नपदार्थ ४ नोव्हेंबर २०१७ ला भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ म्हणून घोषित करण्यात आले होते. खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करण्यामागे बरीचशी कारण आहेत. खिचडी हा पदार्थ अतिशय लोकप्रिय असल्याने भारतात घराघरात खिचडी बनविली जाते. हा पदार्थ फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक देखील असतो. खिचडी आयुर्वेदिक असल्याने ती अनेक आजारांवर उपायकारक आहे. खिचडी बनवतांना जे पदार्थ वापरण्यात येतात ते सर्व आयुर्वेदिक असतात. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नाही तर रुग्णांना सुद्धा खिचडीच खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. खिचडी हा अन्नपदार्थ गरिबांना परवडणारा आहे

२०१७ पासून खिचडीला भारताचे राष्ट्रीय अन्नपदार्थ म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय अन्न म्हणून सरकार कोणता अन्नपदार्थ घोषित करणार यावर सर्वांचे लक्ष लागून होते. अनेक अन्य खाद्य पदार्थ भारताचे राष्ट्रीय अन्न घोषित करण्याची अफवा होती. मात्र शेवटी खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करण्यात आले होते. खिचडी हा पदार्थ सर्व जाती-धर्माचे लोक आवडीने खातात. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करूनच खिचडी बनवता येते. त्यासाठी वेगळी विशेष सामग्री लागत नाही. खिचडीत दोन प्रकार असतात एक म्हणजे फोडणीची खिचडी आणि दुसरी साधी खिचडी .फोडणीची खिचडी बनवण्यासाठी डाळ, तांदूळ काही भाज्या तसेच उपलब्ध असलेली मसाले वापरण्यात येते. खिचडी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात बनवली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून ‘समझौता एक्स्प्रेस’ पुन्हा पाकिस्तानसाठी रवाना होणार

News Desk

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk

“अधीर रंजनची अभी ज्यादा हो रहा है…” मोदी लोकसभेत भडकले

News Desk