HW News Marathi
देश / विदेश

भारताचे पायलट्स पाकिस्तानच्या ताब्यात, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वायुसेनेचा पायलट त्यांच्या ताब्यात असल्याची कबुली दिली आहे. इम्रान यांनी आज (२७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदत घेऊन यांची माहिती भारताला दिली आहे.भारताच्या वायुसेने हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय या वृत्त संस्थेने दिली होती.

“एकदा युद्ध झाले तर माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या हातात नियंत्रण राहणार नसल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधात आम्ही संवाद साधण्यासाठी तयार असल्याचे इम्रान म्हणाले आहे. “इतिहास साक्ष आहे की, जेव्हा युद्ध होते ते कधी कधी संपते हे सांगता येत नाही.”

काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायू दलाच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे. अखेर पाकिस्ताने भारतीय वायुदलाचे पायलट आमच्याकडे असल्याची कबुली दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचाही पाठिंबा, मोदी सरकारचं मोठा पाऊल!

News Desk

राहुल गांधींनी दिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अशा शुभेच्छा

News Desk

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर!

News Desk