HW News Marathi
देश / विदेश

आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे | नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध समस्यांवर देशवासियांशी संवाद साधतात. पंतप्रधान मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांना संबोधित करण्याचा ४६ वा कार्यक्रम होता. कोल्हापूर येथील संतोष काकडे यांनी नरेंद्र मोदींना फोन करून, महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीची माहिती देशवासियांना देण्याची विचारणा केली होती. तेव्हा मोदी यांनी वारीची परंपरा समजावून सांगितली.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने वारकरी वारीत सहभागी होतात.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या महान संतांच्या पादुका पालखीत ठेवून वारकरी वारीत सहभागी होतात. संताचे विचार अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी ताकद देतात. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेतात. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी रेडीओच्या माध्यमातून देशवासियांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशी, विधानसभेत ‘दिशा विधेयक’ मंजूर

News Desk

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk

लखीमपूर हिंसाचारानंतर योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

News Desk