HW News Marathi
देश / विदेश

पर्रीकर गोव्यात दाखल !

पणजी | दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रविवारी दुपारी दोना पावला येथील आपल्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांना घेऊन जाणारे विमान दुपारी २. ३० वाजता गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दाखल झाले.
एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात नेण्यात आले होते. मात्र काही कालावधीनंतर त्यांना घरी जाऊ देण्याचा निर्णय एम्स प्रशासनाने घेतला. पर्रीकरांच्या घेण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने पर्रीकरांच्या निवासस्थानी खास व्यवस्था केली आहे. त्यांना १५ सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अबब…भाजप सदस्य इसीसमध्ये

News Desk

रशियामध्ये महाभूकंप, कामचटका परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

News Desk

विरोधी पक्षहो, आगीत तेल ओतण्यासाठी तुम्हाला कुणी स्वस्त भावात तेलपुरवठा करतं? – सामना

News Desk
राजकारण

अफवेमुळे बळी गेलेल्या त्या पाच जणांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 हजारांची मदत

News Desk

पंढरपूर |मुले पळविणारी टोळी गावात आली असल्याच्या अफवेमुळे धुळे जिल्ह्यातील राईलपाडा या गावात पाच नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या निरपराधांना जमावाने ठेचून ठार मारण्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. त्यातील पाच मृतांच्या मूळगावी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन आरपीआय तर्फे पाचही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजारांची सांत्वनपर मदत केली . यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे तसेच तालुका अध्यक्ष अशोक शिवशरण जितेंद्र बनसोडे; नगरसेवक डी राजसर्वगोड; संतोष पवार किर्तीपाल सर्वगोड प्रवीण माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियात अफवा पसरवण्याची दूषप्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यातून देशात अफवेमुळे निरपराधांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार रोखले पाहिजेत. सोशल मीडियातील अफवा रोखल्या पाहिजेत. समाजाने ही शहानिशा करून पाऊल उचलले पाहिजे. कोणीही कायदा हातात घेता कामा नये. मुले पालविणारी टोळी या अफवेमुळे निरपराधाना ठार करणे ही अत्यंत निंदनीय गंभीर घटना आहे. धुळे येथे ज्यांनी कायदा हातात घेऊन 5 जनांची निर्घृण हत्या केली त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. पुन्हा अश्या घटना घडू नयेत या साठी या गुन्ह्यातील आरोपींना कठोरात काठोर शिक्षा करावी अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

Related posts

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमधून गडकरी बाहेर तर फडणवीसांना स्थान

Aprna

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

swarit

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk