HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजेच ऑक्टोबरपासून सातत्याने इंधनाच्या किंमतींमधील कपात सुरु होती. मात्र, आता ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमतींमध्ये आज ९ पैशांपासून ३० पैशांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, डिझेलच्या किंमतींमध्ये मात्र अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढल्याने ही वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७५.९१ रुपये तर डिझेल ६७.६६ रुपये प्रति लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ७०.२९ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ६४.६६ रुपये एवढी झाली आहे. याआधी देखील इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी भारतीय चलनाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ या कारणांमुळे ही वाढ होत होती. त्यानंतर आज तब्बल २ महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

उर्मिला मातोंडकरांचा मोदींवर निशाणा!

News Desk

राज्यसभेचे नवे निर्वाचित खासदार आज शपथ घेणार

News Desk
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना बजावली नोटीस

News Desk

नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अॅड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी(१२ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये स्वतःची बाजू स्पष्ट करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा दिला होता. फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्हे लपविले होते. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी. यासाठी नागपुरातील अ‍ॅड. सतीश उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

७ सप्टेंबर २०१५ रोजी या न्यायालयाने उके यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे उके यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. ३० मे २०१६ रोजी तत्कालीन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडिवाला यांनी उके यांचा अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच जेएमएफसी न्यायालयाला या प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला. सत्र न्यायालयाच्या त्या निर्णयाविरुद्ध फडणवीस यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता फडणवीस यांचा अर्ज मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला.

Related posts

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

Aprna

पुण्यात होणारी पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी; राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टद्वारे आवाहन

Aprna

कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी !

News Desk