HW News Marathi
देश / विदेश

अवनी वाघिणीचे बछडे देखील नरभक्षक होण्याची शक्यता ?

मुंबई | ज्यावेळी अवनी वाघीण माणसांची शिकार करायची त्यावेळी तिच्यासोबत तिचे बछडेही असायचे. त्यामुळे तिचे बछडेही नरभक्षक होतील, अशी शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीने तब्बल १३ जणांचा जीव घेतला होता. तिच्यामुळे त्या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी (२ नोव्हेंबरला) वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून अवनी वाघिणीला ठार करण्यात आले आहे.

आता वनविभागाकडून अवनी वाघिणीच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वनविभागाकडून तब्बल सात पथके तयार करण्यात आली आहेत. अवनी वाघिणीचे बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत. आईकडूनच बछडे शिकार करायला शिकतात. त्याचप्रमाणे, बछड्यांनी माणसांना खाल्ल्याचे पुरावे असल्याचा दावाही शार्पशूटर शआफत अली यांनी केला आहे. मात्र, मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी ‘११ महिन्यांचे बछडे हे केवळ लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात’ असे स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फेसबुक ‘हे’ फिचर लॉंच करणार नाही

News Desk

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत जिल्हा सोडण्याचे आदेश

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला ‘या’ विरोधी पक्षांचा बहिष्कार

Aprna
देश / विदेश

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

swarit

जमशेदपूर | मुंबई सीएसएमटीहून हावडाला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्याची चाक नादुरुस्त झाल्याचे कळून देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी ही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालविली असून या प्रकारातून रेल्वे अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सीएसएमटीहून सुटल्यानंतर एक्स्प्रेस ज्या अपेक्षित वेळेत पोहोचायला हवी होती त्यापेक्षा तब्बल दहा तास उशिरा पोहोचली. ही ट्रेन महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाड झाल्याची माहिती चक्रधरपूर येथील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर थर्ड एसीच्या बी १ डब्ब्याच्या चाकामध्ये बिघाड झाल्याचे समजले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तपासणीनंतर डबा वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकारात जवळपास ४५ मिनिटे वाया गेली. यामुळे आलेल्या दबावामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी हावडा ट्रेनला नादुरुस्त अवस्थेतच हावड्याला पाठविले. ट्रेनमधील प्रवाशांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याला विरोध करत गडबड करायला सुरुवात केली.

Related posts

राज्यातील ३९ रुग्णांना डिस्चार्ज, तर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर

swarit

राज्यसभेत पेगॅसस प्रकरणावरून पुन्हा गोंधळ, मंत्र्यांच्या हातातून निवेदन खेचून फाडलं!

News Desk

रेल्वे मंत्रालयाची नवी घोषणा, १२ क्लस्टरमध्ये १०९ जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार

News Desk