HW News Marathi
Covid-19

प्रकाश जावडेकर यांनी मास्क घालण्याबाबत सांगितलं की…!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (२३ मार्च) दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारने एक एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. यावेळी जावडेकरांनी देशामध्ये आतापर्यंत किती लसीकरण झालं आहे यासंदर्भातील सविस्तर आकडेवारी जाहीर केली. तसेच त्यांनी करोनाची लस घेतली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुण्यासंदर्भातील सवय हा त्रिसुत्री कार्यक्रम पुढील एक ते दीड वर्षांसाठी सर्व भारतीयांना पाळावाच लागणार आहे असंही म्हटलं आहे.

दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी जावडेकरांना प्रश्न विचारले.युके व्हेरिएंटसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना जावडेकरांनी, “मी काही आरोग्य विषयातील तज्ज्ञ नाहीय मात्र मला हे माहितीय ही हा विषाणू अनेक व्हेरिएंट म्हणजे वेगवेगळ्या रुपामध्ये पुन्हा येतोय. त्यामुळेच लसीकरण मोहीम खूप महत्वाची आहे. जे पात्र आहेत लसीकरणासाठी त्यांनी लस घ्यावी. कारण सध्या लस हेच आपलं एकमेव सुरक्षाकवच आहे,” असं म्हटलं.

तसेच पुढे बोलताना त्यांनी आपलं मास्क दाखवत, “मास्क तर आपल्याला अजून एक ते दीड वर्ष घालवं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळावच लागणार आहे. हातही सतत धुण्याची सवय कायम ठेवावी लागणार आहे. मात्र लस घेतल्याने आपल्याला या विषाणूपासून अधिक सुरक्षा मिळत असल्याने ती घेणं गरजेचं आहे,” असंही सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकसाघाडीची बैठक

swarit

विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

News Desk

राज्यात कोरोनाचा कहर ! आज तब्बल ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण

News Desk