HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. यानंतर आता निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत पवनने याचिकेत म्हटले की, घटनावेळी अल्पवयीन असल्याचा दावा त्यांनी केला होता. आणि फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करवे, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, सोमवारी (२ मार्च) याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाचे त्यांची क्युरेटिव्ही याचिका फेटाळली होती.

यापुर्वी दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने २ मार्च रोजी निर्भया दोषींना पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर निर्भयाच्या दोषींना न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्या (३ मार्च) फाशीवर लढकविण्याच्या मार्गावर शिक्कामोर्तब निश्चित झाले होता. न्यायालयाच्या निर्णयावर तिसऱ्यांदा निर्भयाच्या दोषी फाशीची शिक्षा टळली होती. आता राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळल्यानंतर चौथ्यांना डेथ वॉरंट जारी होणार आहे. मात्र,न्यायालय डेथ वॉरंट जारी कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दया याचिका फेटाळल्यानंतर १४ दिवसांनंतर फाशी देण्याचं वॉरंट जारी होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, १४ दिवसांनंतरच निर्भयाच्या दोषींना फाशी मिळू शकते.

निर्भयाच्या दोषींची लांबणीवर केलेल्या तारखा

निर्भया प्रकरणात यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. न्यायालयाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला, राहूल गांधींची बोचरी टिका

News Desk

विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबणीवर?

News Desk

लॉकडाऊनमध्ये कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा लग्न सोहळा, कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk