HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान केरळमध्ये दाखल, केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि पुरामुळे सध्या मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या पुरामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ८ ऑगस्टपासून केरळमध्ये सुरु असलेल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले.

आज पंतप्रधान केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं, ‘व्यासपीठ तर भाग्यवानांचे कोसळतात,’ टिकैत यांची प्रतिक्रिया

News Desk

आसारामला जन्मठेप | अन्य दोघांना 20-20 वर्षे शिक्षा

News Desk

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्न करण्यास बंदी

News Desk
राजकारण

फैजाबादनंतर आता अहमदाबादचेही नामकरण ?

swarit

नवी दिल्ली । फैजाबादनंतर आता अहमदाबादच्या ही नावात बदल करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. “कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार”, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. अहमदाबादचे नाव ‘कर्णावती’ असे ठेण्यात येणार आहे. ”कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू”, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयानंतर काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. “मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही”,असेही दोशी म्हणालेत. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असे केले आहे.

Related posts

#Article370Abolished Live : कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव शहांनी लोकसभेत मांडले

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk