HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावली, प्रियंका गांधींचा योगींना टोला

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेशात आज (३ जुलै) ८ पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबतच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे अशा शब्दांत त्यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीकाही केली आहे.

“आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे”, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामायण पठण कार्यक्रमात दलितांना घराबाहेर न पडण्याचे फर्मान

News Desk

#Article370Abolished : काश्मीरमधून कलम ३७० रद्द, विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk

UPSC 2019 चे निकाल जाहीर, देशात प्रदीप सिंह तर महाराष्ट्रात अभिषेक सराफ अव्वल

News Desk