HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये बिहाऱ्यांना सुरक्षा द्या । नितीश कुमार

पटणा । ‘गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या बिहारी कामगारांच्या संरक्षणाची काळजी घ्या आणि त्यांच्यावर हल्ले थांबवा,’ अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केले आहे. रुपाणी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आणि बिहार व उत्तर प्रदेशचे मजूर आता सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण

गुजरातच्या साबरकांठामध्ये एका बिहारी कामगाराने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली आगे. त्यामुळे स्थानिक लोकांनी सरसकट उत्तर भारतीय लोकांवर हल्ले सुरू केले आहेत. याप्रकरणी ४३१ हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही या हल्ल्यांमुळे घाबरून सुमारे ५० हजार बिहारी व उत्तर प्रदेशातील कामगार गुजरातमधून आपापल्या गावी निघाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk

“शेअर बाजाराचा हिशोब भाजपला द्यावा लागेल”, संजय राऊतांचा इशारा

Aprna

#Lockdown2 : फ्रान्समधीलही लॉकडाऊन ११ मेपर्यंत वाढला, राष्ट्रपतींनी केली घोषणा

News Desk