HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : भारत करणार पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताकडून पाकिस्तानची संपूर्ण कोंडी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. भारताकडून पाकिस्तानला फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांची आंतरराष्ट्रीय मदत थांबवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.

एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संस्था दहशतवादी कारवाईसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन असते. या संस्थेला भारताकडून पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे देण्यात येणार आहेत. फ्रान्सच्या पॅरिसमध्ये पुढील आठवड्यामध्ये एफएटीएफचे महाधिवेशन, बैठक पार पडेल. यावेळी, हे पुरावे एफएटीएफला सादर करून त्याद्वारे पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली जाणार आहे.

जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशत संघटला पाकिस्तानकडून मदत करण्यात आली त्याचप्रमाणे या हल्ल्याच्या संपूर्ण घटनाक्रमाची संपूर्ण माहिती एफएटीएफकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. एफएटीएफने जुलै २०१८ रोजी पाकिस्तानला संशयित देशांच्या म्हणजेच ग्रे यादीत टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

उद्या पंतप्रधान साधणार देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

News Desk