HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर

वडोदराः कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नवसृजन यात्रेवर असलेले राहुल सर्वात आधी भरुचचा पोहोचले. याठिकाणी ते म्हणाले, येथे उद्योजकांचे सरकार आहे. सर्वकाही त्यांच्याच हाती आहे. येथे पैसा आहे तर सर्वकाही आहे. हे आहे, गुजरात मॉडेल. यानंतर राहुल गांधी तापी, वलसाड, नवसारी आणि सूरतला जातील. या दरम्यान ते नुक्कड सभा आणि रॅलींमध्येही सहभागी होतील. राहुल या दौऱ्यात शेतकरी आणि उद्योजकांशीही चर्चा करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“अजुन किती फेकणार मोदीजी? हद्द झाली राव…!”, मोदींच्या बांगलादेशच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा टोला

News Desk

#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?

News Desk

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

लग्न झाले का?’ हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा

News Desk

अक्षय कुमारची महापालिकेला ३ कोटींची मदत, मास्क, पीपीई किट्सही पुरवणार

News Desk

मृतदेहाच्या अंगावरील सोनेही चोरले

News Desk