HW News Marathi
देश / विदेश

पातळी सोडून राहुल गांधींनी टिका करू नये-सुषमा स्वराज यांचे प्रत्युत्तर 

संघातील महिला बाबत केलेले विधान अयोग्य

अहमदाबाद – आरएसएस मधील महिला बाबत राहुल गांधी यानी केलेल वक्तव्य अयोग्य असल्याचे मत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचे उपाध्यक्ष आहे. शिवाय ते अध्यक्षही होणार असल्याची चर्चा आहे. अशा पदावर असलेल्या व्यक्तीने अशी महिलां बाबत अशी भाषा वापरणे अयोग्य असल्याचे त्या म्हणाल्या. अहमदाबाद येथे आयोजित महिलांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

भाजपने आत्ता पर्यंत ४ महिला मुख्यमंत्री, ४ महिला राज्यपाल आणि ६ केद्रीय मंत्री दिल्या आहेत हे स्वराज यांनी आवर्जून सांगितले. संघा मध्ये महिलांना समान वागणूक दिली जात नाही. संघाच्या शाखेत कधी महिलांना शॉर्ट्स वर पाहिले आहे का अशा पद्धतीची टिका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला स्वराज यांनी आज प्रत्युत्तर दिले. टिका करताना राहुल गांधी यांनी पातळी सोडू नये असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

News Desk

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूर यांची दुबई पोलिसांकडून चौकशी

News Desk

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घटवण्याचा दाऊदचा कट

News Desk