HW News Marathi
देश / विदेश

जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार – राहुल गांधी

नवी दिल्ली | दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

“हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत,”असे आवाहन राहुल गांधी यांनी ट्विट करत केले आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, परिस्थीती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठी चार्ज केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

News Desk

वंदे मातरम् गायले नाही म्हणून स्थानिकांची शिक्षकाला मारहाण

News Desk

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णय

Aprna