HW News Marathi
देश / विदेश

“मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिले”, राहुल गांधी पुन्हा गरजले

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. राज्यसभा, लोकसभेत देखील या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज राजस्थानमधील अजमेर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी दिला आहे : भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांची चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे, उद्योजकांची नाही. असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ‘या’ ५ विमानतळांची जबाबदारी आता अदानीकडे

News Desk

जाणून घ्या… गुरूपौर्णिमेचे महत्व

News Desk

कामगार संघटनांचा आज ‘भारत बंद’

News Desk