HW News Marathi
देश / विदेश

‘हा’ निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते !

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, असा निकाल सर्वोच्च न्यायालायाने आज (९ नोव्हेंबर) दिला आहे. “ऐवढ्या वर्षाची प्रतिक्षा होती ती अखेर संपली, या संपूर्ण आंदोलनात ज्यांनी बलिदानाचे सार्थक”, झाल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की, “हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते.”

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधले जावे. पण यावेळी फक्त एकच वाटते, यावेळी हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते.” तसेच “आता लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, आणि रामराज्य ही यायला हवे,” असे देखील राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

गेली अनेक दशकांपासून अयोध्या प्रकरण प्रलंबित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनंतर अखेर या वादावर पडदा पडला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असून मुस्लिम समुदायासाठीसुद्धा अयोध्येत पर्यायी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनंतर सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी काय करावे, पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

News Desk

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk

कोल्हापूर-सांगलीमधील महापुरामुळे मुंबईसह ठाण्यातील दंहीहडी रद्द

News Desk