HW News Marathi
देश / विदेश

उत्तर कोरियाच्या हल्ल्याला प्रत्त्यूतर देण्यास सज्ज- अमेरिका

वॉशिग्टंन (वृत्तसंस्था) – बॅलेस्टिक मिसाइलद्वारे अमेरिकेचा गुआम प्रांत उडवून देण्याची उत्तर कोरियाने धमकी दिल्याने अमेरिका हदरली आहे. अवघ्या 14 मिनिटांत गुआम प्रांत उध्वस्त करण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली आहे. दरम्यान, या धमकीला भीक घालत नसल्याचे अमेरिकेने सांगितले. तसेच गुआमच्या नागरिकांचे संभावित हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. दरम्यान, चीननेही यात हस्तक्षेप केला असून कोरियाने अततायीपणा करू नये, असे सांगितले आहे. तर जपानदेखील अमेरिकेच्या मदतीसाठी सरसावला असून मिसाइलविरोधी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. उत्तर कोरियाचे प्रमुखांनी गुआम प्रांत उडवण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगभरात अशांतता पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने खबरदारीचा उपाय म्हणून येथील जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या प्रांताच्या अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केरळच्या मदतीला देश आला धावून…

News Desk

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

News Desk

Tarun Sagar Died | राष्ट्रसंत तरुण सागर यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk
मनोरंजन

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk

उल्का चारुदत्त मोकासदार-

१८वे शतक हे स्त्री सुधारणा पर्व म्हणून ओळखले जाते. या काळात ज्या अनेक कार्ययोगिनी सामाजिक क्षेत्रात योगदान देत होत्या, त्यापैकी एक म्हणजे काशीबाई कानिटकर माहेरच्या बापट कुटुंबातून त्या ९ व्या वर्षी

काशीबाई कानिटकर

काशीबाई गोविंदराव कानिटकर झाल्या. सुधारक पती आणि कट्टर धार्मिक पारंपरिक सनातन सासर. अशा दुहेरी कात्रित गोविंदरावांच्या सहकार्याने त्या शिकु लागल्या. गोविंदरावांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या प्रार्थना समाजाच्या स्त्रियांच्या शाळेत शिक्षण सुरू झाले, खरेपण त्यात ही अनेक अडथळे. सुबोध पत्रिकेत त्यांनी लिहलेला ‘ पूर्वीच्या स्त्रिया व हल्लीच्या स्त्रिया’ हा लेख सदाशिवराव केळकरांनी छापून आणला आणि खर तर एका पहिल्या महिला स्तंभ लेखिकेचा तो उदय होता, असे म्हणल्यास वावगे ठरू नये. या काळात त्या हळूहळू लिहायला लागल्या. तिथूनच त्यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या चरीत्र लेखनाचे वेध लागले. आणि त्यानी डॉक्टर आनंदीबाई यांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशित केले.एक उत्तम चरित्रकार म्हणून त्यांचे नाव इतिहासात अधोरेखित झाले आहे. त्यांच्या कार्याचे, अभ्यासशिलतेचे योगदान पाहून पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनच्या उद्घाटनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावले आणि सार्वजनिक कार्यक्रमातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ही इतिहासात त्यांची नोंद आहे. तसेच राष्ट्रीय सभेस जाणारी पहिली हिंदुस्तानी स्त्री सुद्धा त्याच ठरतात. १९०९ साली झालेल्या वसंत व्याख्यान मालेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ही त्यांचेकडे मान जातो. भरत महिला परिषदेत त्यांनी वाचलेला ‘ स्त्रीया आणि आर्थिक स्वातंत्र्य ‘ हा पेपर आज ही त्यांच्या अभ्यासुपणा आहे स्त्रीसुधारणावादी भूमिकेचे महत्व नमूद करतो. अशा बौद्धिक, अभ्यासू, व्यासंगी, चतुरस्त्र कार्ययोगीनीचा आज जन्मदिवस….

माझ्या सुदैवाने मला इतिहास संशोधक मंडळाच्या वाचनालयात त्यांचा दुर्मिळ फोटो मिळाला. आज या स्त्री सुधारणा पर्वातील या दिपस्तंभाला माझे मनोभावे वंदन आणि त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

Related posts

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

swarit

नाना पाटेकरांनी का दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल ?

News Desk

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

News Desk