HW News Marathi
मनोरंजन

नाना पाटेकरांनी का दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल ?

मुंबई | तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात नाना पाटेकर हे आज (8 आॅक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार होते. तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे जोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत नाना पाटेकर माध्यमांशी संवाद साधणार नाही असे सांगत ही पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. तरीही आज दुपारी नाना पाटेकर हे अवघ्या काही मिनिटांसाठी माध्यमांसमोर आले होते. परंतु यावेळीही नाना पाटेकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. यावेळी नाना पाटेकर पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत तिथून निघून गेले.

‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांवर काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर म्हणाले होते कि, “जे खोटे आहे ते खोटेच आहे.” परंतु यासंदर्भात नाना पाटेकर यांनी मात्र कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अद्यापही दिलेली नाही. दुसरीकडे नाना पाटेकर यांनी आपल्याला कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचा दावा तनुश्री दत्ताकडून केला जात आहे. तसेच नोटीस नाही पण धमक्या मात्र मिळत आहेत असा आरोपही तनुश्रीने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात बॉलिवूडमध्ये दोन गट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aprna

डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk