HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदी व जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था उत्तमरीत्या सुधारलेली असताना, भारतात या दोन धक्क्यांमुळे (नोटबंदी,जीएसटी) आर्थिक विकासाचा वेग कमी झाला’, अशी टीका रघुराम राजन यांनी केली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठातील व्याख्यानात ते बोलत होते.

देशात दरमहा १० लाख नोकऱ्यांची निर्मिती होणे ही गरज असल्याचेही राजन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता बँकांचे शुद्धिकरण, अपुऱ्या पायाभूत सुविधा, ऊर्जा प्रकल्पांची कमतरता या तीन प्रमुख समस्या असल्याचे यावेळी राजन म्हणाले. त्याचबरोबर ‘आता आहे त्याहून अधिक विकास दर गाठण्याची भारताची क्षमता आहे’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिराकिंग निघाला घोटाळेबाज

News Desk

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

News Desk

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

News Desk