HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वसनामुळे चांगलेच राजकारण तापलेले चित्र सध्या दिसत आहे. ” सत्ता आली तर शासकीय इमारती आणि परिसरात लावण्यात येणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे”, आश्वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भापजने संतप्त व्यक्त केली आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. यात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे. यात काँग्रेसने असे लिहिले आहे की, सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उलटवार करत म्हटले की, ‘मंदिर नही बनने देंगे, शाखा नही लगने देंगे हेच’, सध्या काँग्रेसचे धोरण आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत सोडले मौन

Aprna

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna