HW News Marathi
देश / विदेश

आर्थिक निकषावर आरक्षण, केंद्रात प्राथमिक चर्चा

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरून संपुर्ण महाराष्ट्र पेटतानाचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले आहेत. तरी देखील सरकारने लक्ष दिले नाही. म्हणून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेला आहे. सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने यावर प्राथमिक चर्चा सुरू असून चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या तीन दिवसात मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकांनी आरक्षणासाठी औरंगाबादच्या गोदावरी नदी पात्रात काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करून आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर मराठा समाजाने मंगळवारी महाराष्ट्र, बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. या बंदामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ठिकठिकाणी तोडफोड-जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम ३६८ द्वारे घटना दुरुस्तीची तरदूत करण्यात आली आहे. संसदेतील उपस्थित असलेल्या सदस्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत, अशा संख्येने मंजूर करता येते. त्यानंतर राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. देशात आतापर्यंत १२३ वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जट आणि राजस्थानात गुर्जर देशातील या राज्यात आरक्षणाासाठी आंदोलन काढण्यात आली आहेत. यानंतर देशातील विविध राज्यातून आरक्षणाची वाढती मागणी पाहता. केंद्र सरकार आरक्षणावर चर्चा करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk

माणसांचे मांस खाणारे नरभक्षक जोडपे अटक

News Desk

राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावांची घोषणा

Aprna