HW News Marathi
देश / विदेश

आर्थिक निकषावर आरक्षण, केंद्रात प्राथमिक चर्चा

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरून संपुर्ण महाराष्ट्र पेटतानाचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले आहेत. तरी देखील सरकारने लक्ष दिले नाही. म्हणून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेला आहे. सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने यावर प्राथमिक चर्चा सुरू असून चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्या तीन दिवसात मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकांनी आरक्षणासाठी औरंगाबादच्या गोदावरी नदी पात्रात काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करून आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर मराठा समाजाने मंगळवारी महाराष्ट्र, बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. या बंदामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ठिकठिकाणी तोडफोड-जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम ३६८ द्वारे घटना दुरुस्तीची तरदूत करण्यात आली आहे. संसदेतील उपस्थित असलेल्या सदस्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत, अशा संख्येने मंजूर करता येते. त्यानंतर राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. देशात आतापर्यंत १२३ वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जट आणि राजस्थानात गुर्जर देशातील या राज्यात आरक्षणाासाठी आंदोलन काढण्यात आली आहेत. यानंतर देशातील विविध राज्यातून आरक्षणाची वाढती मागणी पाहता. केंद्र सरकार आरक्षणावर चर्चा करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे

News Desk

भाजपच्या नेत्यांमध्ये अजूनही रसिक शिल्लक असल्याचे ऐकून समाधान वाटलं | सुप्रिया सुळे

News Desk

आम्हाला शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांची मागणी

News Desk
मुंबई

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk

मुंबई | लोअर परळचा रेल्वे पुलाच्या पाहणीवरून शिवसेना-मनसे कार्यकर्त्ये आमने-सामने आले. दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे कार्यकर्ते आले होते. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी त्यांच्या कार्यकर्ते दाखल झाले.

या पाहाणी दरम्यान मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने लावला आहे. हा पूल २४ जुलैपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. हा वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालवण्यासाठी बंद केला आहे. या पुलाच्या पाहणीवरून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी वेळीस मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

गेले दोन दिवस लोअर परळ स्टेशनजवळील पुलाच्या दुरुस्तीबाबत बंद करण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहे. कोणताही पूर्वसूचना व पर्यायी नियोजन न करता हा पूल बंद केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.

Related posts

आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

भिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत

News Desk