HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा कहर! पुढचे ४ आठवडे महत्वाचे

नवी दिल्ली | कोरोनाचे देशातील संकटदिवसेंदिवस चिंतेचे होत चालले असून, पुढचे ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

निति आयोगाचे सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा.

सर्व वयोगटातील नागरिकांना लस दिली जावी, ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून ते योग्य नसल्याचे डॉ. पॉल आणि राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, IMAने नरेंद्र मोदी पत्र लिहित १८ वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात यावी अशी पत्रातून विनंती केली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही २५ वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात यावी अशी विनंती मोदींकडे केली आहे.

कोणत्याही देशाने सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुले केलेले नाही, याकडेहीराजेश भूषण यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र व दिल्ली या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुले करावे, अशी मागणी केली होती.

“राज्यात नव्या 55 हजार 469 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज नवीन 34 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात सद्यस्थितीत एकूण 4 लाख 72 हजार 283 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.98% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोरोना परिस्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश

News Desk

कोरोनाचा कहर! आता घरातही मास्क घालायची आली वेळ, केंद्राचा गंभीर इशारा

News Desk

एफआयआर दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, अर्णब गोस्वामींचा दावा

News Desk