HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे सरसंघचालकांनी केले स्वागत

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) कलम ३७० हटवणल्यानंतर राज्यसभेत मांडले. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वागत केले आहे. भागवत म्हणाले की, “सरकाच्या धाडसी निर्णायेच हार्दिक अभिनंदन केले आहे. तर जम्मू-काश्मीरसह देशाच्या हिताच्या दृष्टीने स्वार्थ आणि राजकीय भेद दूर ठेवून सरकारच्या प्रस्तावाचे स्वागत करत त्यांचे समर्थन केले पाहिजे, असा सल्ला भागवत यांनी विरोधकांना दिला आहे,” आरएसएसच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करण्यात आले आहे.

मोदी सरकराने घेतलेला निर्णय जम्मू-कश्मीरसह संपूर्ण देशाच्या हितासाठी हे अत्यावश्यक असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असे अमित शाह म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या जवानांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

News Desk

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

Aprna

सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदी नियुक्ती

swarit