HW News Marathi
देश / विदेश

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

नवी दिल्ली | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये महापूर आला होता. यानंतर केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळची आर्थिक परिस्थितीची पुन्हा घडी बसविण्यासाठी देशाभरातून मदतीचा ओघ वाढत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी संयुक्त अरब अमिरातीने ७०० कोटींच्या मदती करण्यासाठी तयार असल्याची बातमी आली होती.

केंद्र सरकारने युएईची ७०० कोटीची मदत नाकारल्याने देशभरात यावरून चांगलेच राजकारण तापले होते. यानंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर भारतात अशा मदतीवर वादविवाद उत्पन्न झाले. जी कधी जाहीर केली गेली नाही, असे स्पष्टीकरण युएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी दिले. अबुधाबीचे राजा शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क साधत केरळला ७०० कोटींची मदत देणार असल्याची अफवा पसरली होती.

अलबन्ना यांनी केरळला मदतीसाठी ७०० कोटींचचा आकडा अधिकृत जाहीर झालेला नाही. युएईकडून किती मदत मिळेल. याबाबत अद्याप ठरलेले नाही. केरळमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यासाठी एक समितीची स्थापना केली आहे. त्यांचे काम अद्याप सुरू आहे. केरळमधील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी निधी जमविण्याचे कामही सुरु आहे, असे सांगितले. तसेच भारत सरकारने परदेशातील मदत नाकारल्याबाबतही सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. भारतातील नियमांची पूर्ण कल्पना आहे, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विवाह बाह्य संबंध आता अपराध नाही, कलम ४९७ रद्द

News Desk

दादा गाली देते हे, तारीफ भी करते हें

News Desk

पिझ्झा खाणे आता धोक्याचे… पिझ्झा डिलेव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह !

News Desk
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही, जाणिवपूर्वक विरोधकांना बोलू न देण्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. मागच्या दोन अधिवेशन तसेच या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत त्याचा अनुभव आला.

महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विरोधकांचा आवाज पोहोचू नये, यासाठी सभापतींतीविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. नीलम गो-हे या वरच्या सभागृहाच्या नेत्या आहे, परंतु त्यांचे नाव विधानसभेत त्यांच्या नावाची चर्चा घेतले. सुनील प्रभुंनाही बोलून गोंधळ घोलण्यास मुभा देण्यात आली.

एकूणच विधान परिषदेच्या सदस्याचे नाव रेकॉर्डवरून काढण्याला अध्यक्षांनी तत्काळ मंजुरी दिली. धनंजय मुंडे यांच्या नावे घोषणाबाजी होते, त्यांचे नाव देखील वगळण्याची गरज आहे. परंतु त्यांनी वेगळा न्याय दिला. अध्यक्षांची भूमिका पक्षपातीपाणाची राहिली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्व काही पोरकटपणा, कोणताही सुसंतपणा नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Related posts

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा

News Desk