HW News Marathi
मुंबई

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

कल्याण | कल्याणमधील नेतीवली लोकग्राम येथील रसायनमिश्रित विहिरीत सफाईसाठी एक सफाई कामगार उतरला होता. त्यानंतर तो बराच वेळ विहिरी बाहेरतून बाहेर न आल्याने २ स्थानिक नागरिक सफाई कामगाराला वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. परंतु तिघेही विहिरीतून बाहेर आले. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाचे प्रमोद वाकचोरे आणि अनंत शेलार हे दोन जवान विहिरीत उतरले. मात्र ते देखील बाहेर आले नाही. त्यानंतर पाचजणही बुडाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी मदतीसाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठविण्यात आली आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान अनंत शेलार, प्रमोद वाकचोरे, राहुल गोस्वामी (मुलगा) आणि गुणाभाई गोस्वामी (वडील) यांचे मृतदेह सापडले असून अन्य एका मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

News Desk

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

News Desk