HW News Marathi
देश / विदेश

हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांची साडी उतरविण्या

नवी दिल्ली – येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांच्या अब्रूवर घाला घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेने याबाबत व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट पोलिसात तक्रार केल्याने पीडितेलाचं नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने महिला कर्मचाऱ्यांची साडी खेचून उतरविण्याचा आणि तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. हा प्रकार 29 जुलैला दिल्लीच्या प्राईड प्लाजा हॉटेलमध्ये घडला.

33 वर्षीय पीडित महिला दोन वर्षांपासून हॉटेलच्या गेस्ट रिलेशन सेक्शनमध्ये नोकरी करत होती. हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया अनेक दिवसांपासून शरीरसुखासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. याबाबत तिने व्यवस्थापनाकडे तक्रारीही केल्या होत्या. 29 जुलैला त्याने पीडित महिलेला त्याच्या रुममध्ये बोलवले. तिथे त्याने साडी खेचून महिलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पवनच्या रुममध्ये एक व्यक्ती आली, हीच संधी साधून पीडित महिला तिथून बाहेर पडली. हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

UK च्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड

Aprna

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी, इम्रान खानकडून टीमचे अभिनंदन

News Desk

आज ‘ब्लडमून’ चंद्रग्रहण

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

माल्ल्यावर कारवाई निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

News Desk

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाच टाळे लावले! सामनातून केंद्रावर निशाणा

News Desk

१० जनपथचा चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास…

News Desk