HW News Marathi
देश / विदेश

स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपाल दोन्ही हत्याप्रकरणी दोषी

हिसार | सतलोक आश्रमातील दोन हत्या प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपाल यांना न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्यासह २९ जणांनादेखील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. येत्या १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच रामपालवर असलेल्या देशद्रोहाच्या आरोपावर १९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताना तीन किलोमीटर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२०१४ साली रामपालच्या सतलोक आश्रमात संस्थायास्पदरित्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.ती महिला रामपालची भक्त होती. त्याचप्रमाणे २०१४ सालीचा रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात मोठी वादावादी आणि धक्काबुक्की झाली होती. यावेळी हिंसाचारही मोठ्या प्रमाणात वाढला होता. या प्रकरणाच्या निकालादरम्यानही अशाप्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. तसेच जिल्ह्याच्या सीमांवर देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्याचप्रमाणे रामपाल याच्या समर्थकांकडून गोंधळ होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी निकाल देण्यासाठी हिसार येथील मध्यवर्ती कारागृहातच न्यायालयीन सुनावणी घेण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी. आर. चालिया यांच्यासमोर तुरुंगातच रामपाल व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगद्वारे ही प्रक्रिया पार पडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Republic Day | तिरंग्याच्या रोषणाईने मुंबईची शोभा वाढली

News Desk

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

News Desk

धक्कादायक ! एका सीआरपीएफ जवानाला पोलिसांकडून मारहाण

News Desk
देश / विदेश

भ्रष्टाचारी पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा द्यावा!

News Desk

नवी दिल्ली | राफेल डील खरेदी प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. राफेल डीलवरून राहुल मोदींवर टीका करण्याची एकही संधी सध्या सोडत नाहीत.

 

‘मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ते आले. परंतु ते आता राफेल डीलवरून भ्रष्ट्राचारात अडकले असल्याचे राहुल यावेळी बोलत होते. तसेच पुढे राहुल असे देखील म्हटले की, ‘देशातील जनतेचे ३० हजार कोटी रुपये अंबानींना यांनी दिले आहेत. मोदी देशाचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी यांची चौकीदारी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राफेल डीलवर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडत असताना देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांच्या अचानक फ्रान्स दौरा का? करतात, यावरून राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे.

Related posts

प्रेमी युगूलाची दगडाने ठेचून हत्या

News Desk

आयकर रिटर्न भरण्याची तारिख पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

swarit

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

News Desk