HW News Marathi
देश / विदेश

सुषमा स्वराज यांना ‘पंतप्रधान’पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी दिला पाठिंबा

मुंबई | भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्टला रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सुषमा स्वराज यांच्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठ्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या.

“आज तरी हुशार, ब्रिलियन्ट अशीच एकच व्यक्ती भाजपकडे आहे, ती म्हणजे सुषमा स्वराज. पंतप्रधानदासाठी ती अप्रतिम पसंती होईल. लायक आहे. हुशार बाई आहे. ती अप्रतिमरित्या दणदणीत काम करील असे माझे स्पष्ट मत, बाळासाहेब ठाकरे सामनातल्या मुलाखतीत माडले होते.” सुषमा स्वराज यांच्याबाबत ८ सप्टेंबर २०१२च्या सामनातल्या मुलाखतीत असे मत बाळासाहेब ठाकरेंनी हे विधान केले होते.

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा म्हटले की, “स्वराज यांच्याच नावावर शिवसेना आजही ठाम असल्याचे देखील म्हटले होते.” सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशीदेखील त्यांची ओळख आहे. स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र खाते सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या होत्या. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्तीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मोदींच्या परराष्ट्र धोरणांमध्ये स्वराज यांचा कायमच महत्वाचा वाटा राहीला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग बाराव्या दिवशी इंधनात घट

swarit

देशभरात आजही इंधन दरात घट, पेट्रोल ८२.९४ तर ,डिझेल ७५.६४ रुपये

swarit

जे.पी.नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

swarit